राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना पुन्हा डोक वर काढताना दिसतो आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत होते. यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन संदर्भात लगेच निर्णय घेणार नाही. याबाबत सर्व नेत्यांशी चर्चा केली जाईल, त्यानंतर लॉकडाऊनसंदर्भात निर्णय होईल.
पत्रकार परिषदेत बोलताना राजेश टोपे यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या मुद्यावर व लसीकरणावर भाष्य केले. सध्या दररोज तीन लाख लोकांचं लसीकरण केलं जात आहे, तीन महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
3 महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण करणार…
राज्यात सध्या दररोज 3 लाख लोकांचं लसीकरण करण्यात येत आहे. तसेच लसीकरणाला आणखी गती देण्यासाठी २० बेडेड हॉस्पिटलपर्यंत देखील लसीकरणाची व्यवस्था केली जात आहे. खासगी ठिकाणं व ग्रामीण भागात उपकेंद्रापर्यंत लसीकरणाच्या दृष्टीने नागरिकांना सुलभता व्हावी, यासाठी आम्ही व्यवस्था करत आहोत. त्यामुळे इथून पुढे आणखी जे जे लोकं लसीकरणाची मागणी करतील, सगळे अर्ज आम्ही पुढे पाठवून मंजुरी घेऊ. येत्या तीन महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण संपवायचा असल्याचा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला.
Comments
Loading…